⚜️संधीचा फायदा⚜️
प्राचीन काळी एक राजा जंगलात शिकारासाठी गेला. रस्ता भटकल्यामुळे राजाचे सैनिक मागेच राहिले. राजाला तहान लागली. तेवढ्यात त्याला एक लाकूडतोड्या दिसला. राजाने त्याच्याकडून पाणी घेतले आणि पिले. त्यानंतर राजा त्याला म्हणाला- तू माझ्या महालात ये, मी तुला पुरस्कार देईल.
काही दिवसानंतर लाकूडतोड्या राजाला भेटण्यासाठी आला. त्याला पाहून राजाला खूप आनंद झाला आणि राजाने त्याला चंदनाच्या झाडांची एक मोठी बाग भेट दिली. लाकूडतोड्या चंदनाची बाग मिळाल्यामुळे खूप आनंदी झाला. आता आयुष्य आरामात व्यतीत होणार असे त्याला वाटले. परंतु लाकूडतोड्याला चंदनाचे महत्त्व माहिती नव्हते. लाकूडतोड्या रोज चंदनाचे एक-एक झाड तोडून कोळसा तयार करू लागला आणि विकून पोट भरू लागला. काही दिवसांमध्येच चंदनाची सुंदर बाग एक ओसाड जमीन बनली आणि त्यावर कोळशाचा ढेर लागला होता. बागेत आता फार थोडी चंदनाची झाडे शिल्लक राहिली होती. ही झाडे लाकूडतोड्याला सावली देत होते.
एके दिवशी राजा त्या बागेत आला आणि तेथील परिस्थिती पाहून आश्चर्यचकित झाला. राजा लाकूडतोड्याला म्हणाला- मी तुला चंदनाची हिरवीगार बाग दिली होती आणि तू हे काय करून ठेवले. लाकूडतोड्याने राजाला संपूर्ण गोष्ट सांगितली. लाकूडतोड्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राजाने त्याला चंदनाचे एक छोटेसे लाकूड दिले आणि बाजारात विकून येण्यास सांगितले. लाकूडतोड्याला त्या लाकडाचे चांगले पैसे मिळाले. त्याने ही गोष्ट जाऊन राजाला सांगितली. राजा म्हणाला- या लाकडाचे मूल्य कोळशापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. राजाचे शब्द ऐकून लाकूडतोड्याला आपल्या चुकीची जाणीव झाली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लाकुडतोड्या आपल्या नशिबाला दोष देऊ लागला. त्यानंतर लाकूडतोड्या आपल्या गावी निघून गेला. सर्वांना आयुष्यात कधी न कधी पुढे जाण्याची संधी मिळते. काही लोक या संधीचा फायदा घेतात तर काही लोक ती संधी ओळखूच शकत नाहीत. यामुळे ते पुढे जात नाहीत.
तात्पर्य :- कधीही नशिबावर अवलंबून राहू नये. संधी ओळखून लाभ घ्यावा.