⚜️दुहीचे फळ⚜️
एक शिका-याने
पक्षयांना पकडण्यासाठी एक जाळे पसरविले.
त्यात दोन पक्षी अडकले. परंतु त्यांनी परस्पर विचार करून ताबडतोब त्या जाळ्यासकट
उडण्यास सुरवात केली. शिका-याला ते पाहून दुःख झाले; तरीही तो जमिनीवरून पक्षयांकडे
पाहत त्या दिशेने पळत सुटला. एका माणसाने बसल्या बसल्या हे दृश्य पहिले. त्याने
शिका-याला जवळ बोलावून विचारले. "तू विनाकारण का पळत आहेस? पक्षी तर जाळे घेऊन आकाशात उडत आहे."
शिकारी
म्हणाला,
" आता या पक्षामध्ये मित्रता आहे. परस्पर मेळ साधून ते एकाच
दिशेने उडत आहेत. म्हणूनच ते माझे जाळे पळवू शकले; परंतु
थोड्या वेळाने त्यांच्यात भांडण किंवा कुरबुर होऊ शकते. मी त्यांच्या मागे या
अपेक्षेने धावत आहे.
जेव्हा एकमेकांशी भांडण केल्यामुळे जाळे व ते खाली
पडतील त्यावेळेस मी त्यांना पकडीन".
शिकारी
म्हणाला,
ते खरे ठरले थोड्या वेळाने ते पक्षी दमले. तेव्हा आपण कुठे उतरायचे
यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाला. सामंजस्य नाहीसे झाल्यामुळे उडण्याची
दिशा व पंखांची गती सारखी राहिली नाही.
त्यामुळे
ते जाळे सांभाळू शकले नाहीत. जाळ्याच्या भाराने अडकत ते पण खाली पडावयास लागले व
जाळ्यात अडकले. त्यांचे पंखदेखील गुरफटले गेले. परिणामतः जाळ्यासकट ते जमिनीवर
पडले. शिका-याने त्यांना सहज पकडले.
तात्पर्य :- एकीत बळ असते. दुहीने आपला नाश होतो.