⚜️ वाटणी - एक उत्तम निर्णय⚜️
वडील - बापुरावमोठा मुलगा - राकेश
मधवा - सुरेश
धाकटा - मुकेश
राकेश :- बाबा ! पंचमंडळी जमली आहे , आता वाटणी करा.
सरपंच :- जर एकत्र रहाण जमत नसेल तर मुलांना वाटुन दिलेल बरं, आता हे सांगा की तुम्ही कोणत्या मुला बरोबर रहाणार ?
(सरपंचांनी बापुरावना विचारले. )
राकेश :- हे काय विचारण झाल, चार महीने बाबा माझ्या कडे रहातील आणि चार महीने मधल्या कडे, चार महीने धाकट्या कडे रहातील.
सरपंच :- चला तर मग निर्णय पक्का झाला , आता संपत्तीची वाटणी करुया !
बापुराव :- (एवढा वेळ आकाशाकडे डोळे लावून बसला होता. अचानक ओरडला ,)
"कसली वाटणी ?
वाटणी मी करणार , या तिघांनी अंगावरच्या कपड्यांवर माझ्या घरातून बाहेर निघावे.चार महीने आळीपाळीने माझ्या घरी रहायला याव, आणि बाकीच्या महिन्यांची व्यवस्था ज्याचीत्याने करावी ...."
"संपत्तीचा मालक मी आहे "
तीनही मुलं आणि पंचमंडळींचा आवाज बंद झाला , बापुरावनी वाटणीची नवीनच शक्कल लढवून सगळ्या वयस्कर मंडळींचे डोळे उघडले. याला म्हणतात निर्णय.
तात्पर्य:- वाटणी पोरांनी नाही, आईबापांनी वाटणी करायची.