⚜️आयुष्य कठीण अजिबात नसतं . . !! ⚜️
⚜️आयुष्य कठीण अजिबात नसतं . . !! ⚜️
- कधी नळाला पाणी नसतं. कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं.
- कधी पगार झालेला नसतो. कधी झालेला पगार उरलेला नसतो. कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो.
- कधी जागा नसते. कधी जागा असून स्पेस नसते. कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते.
- कधी डब्यात आवडती भाजी नसते. कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते. दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते.
- कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो. कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्यासारखे वाटते.
- कधी काही शब्द कानावर पडतात. कधी नको ते शब्द कानावर आदळतात.
- कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात.
- कधी आपण कसे वागायचे समजत नाही. कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही.
- कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही. कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही.
- कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही. कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही.
- कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही.
- कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटू लागतो. कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो.
- कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो.
यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ? ताण घेतला तर तणाव. आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याच काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते. आपण नदी सारखं जगावं. सतत वहात रहावं या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं .