⚜️उतारा वाचन भाग ३१⚜️
भारतात केळी, हरभरा, तूर, मूग, वाटाणा यांसारखी कडधान्ये पिकतात. लोकांच्या आहारात तेथील धान्ये, कडधान्ये, भाज्या आणि फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. 'जनगणमन' हे आपले राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात. सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो. प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे. मी भारतीय आहे; याचा मला अभिमान आहे.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) भारतात कोणती फळे पिकतात?
२) लोकांच्या आहारात काय काय असते ?
३) भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे ?
४) आपले राष्ट्रगीत कोणते आहे ?
५) शेतात कष्ट कोण करते ?
६) कामगार कोठे काम करतात ?
७) आपले रक्षण कोण करते ?
८) प्रत्येकजण कशासाठी मनापासून प्रयत्न करतो ?
९) आपल्या देशाचे नाव काय आहे ?
१०) प्रत्येक भारतीयाला काय वाटते ?
११) आपल्या राष्ट्रध्वजाचे चित्र काढून रंगवा.
१२) वरील उतारा सुंदर हस्ताक्षरात लिहा.