⚜️15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक ..⚜️
- १)१५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वज फडकवतात तर २६ जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात... यामागील कारण आपला देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपतिपद अस्तित्वातच आलेलं नव्हतं....
- २) १५ ऑगस्टला राष्ट्रीय ध्वज उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो... त्याला ध्वजारोहण म्हणतात तर, २६ जानेवारीला ध्वजाची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून ध्वज अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून ध्वज फडकवला जातो.....
- ३)१५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांचा ध्वज (युनियन जॅक) खाली उतरला व भारताचा ध्वज वर चढवला... म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर २६ जानेवारी १९५० ला भारताचा ध्वज होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून ध्वज बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरच्यावर गाठ सुटून ध्वज हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला ध्वज फडकवणे म्हणतात.....
- ४) १५ ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर, २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर ध्वज फडकवला जातो... आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.....
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421