⚜️कर्म आणि भावना⚜️

 ⚜️कर्म आणि भावना⚜️  

     एकदा एक बाई गायीला केळे खायला घालत होती.  पण गाय ते केळं खात नव्हती. ती बाई परत -परत त्या गायी जवळ जाऊन केळे गायीच्या तोंडासमोर नेत होती पण गाय केळं खायला तयार नव्हती.
 शेवटी गाय वैतागली आणि ती बाईला शिंगाने मारायला धावली.  तशी ती बाई पळून गेली. त्या गायीच्या जवळच एक सांड उभा होता.  तो गायीच्या जवळ येऊन बोलला,'ती बाई एव्हढं प्रेमाने खाऊ घालत होती तर तु का  नाही खाल्लस ?' 
तेव्हा गाय म्हणाली,'आज तिची एकादशी आहे म्हणून पुण्य कमावण्यासाठी मला खाऊ घालत होती. एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते तर काठी घेऊन मारायला धावते आणि मला हाकलून देते. 
 पुढे गाय बोलली,'भुकेल्याला प्रेमाने सुखी भाकरी दिली तरी गोड  लागते. जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो दुर्योधन आहे. जो केवळ आपल्या माणसांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो तो युधिष्टीर आहे. आणि जो  सर्वांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो श्रीकृष्ण आहे. '
तात्पर्य:- पुण्य कर्म करण्याबरोबर भावना महत्वाच्या असतात.