⚜️विद्याधन उपक्रम - काय होईल ते सांगा⚜️

@ काय होईल ते सांगा @

1) रोपांची कुंडी अंधारात ठेवली ; तर काय होईल...
    (1) रोप सुकेल 
    (2) रोप जोराने वाढेल
    (3) रोपाला पाणी जास्त लागणार नाही
    (4) रोपांची वाढ होणार नाही

2) हवेत पाण्याच्या वाफेचे प्रमाण वाढले ; तर काय होईल...
    (1) घाम अधिक येईल 
    (2) पाऊस पडेल 
    (3) हवा उष्ण होईल 
    (4) हवा दमट होईल 

3) पेरणीनंतर खूप पाऊस पडून शेतात पाणी साठले ; तर काय होईल...
    (1) पीक जोमाने वाढेल 
    (2) ओला दुष्काळ पडेल 
    (3) पेरलेले बी कुजेल 
    (4) पिकात तन वाढेल 

4) कापूस तयार झाल्यावर पाऊस पडला ; तर काय होईल...
    (1) माती लागून कापूस खराब होईल 
    (2) कापूस स्वच्छ होईल 
    (3) कापसाचे वजन वाढेल 
    (4) कापसातून सरकी काढणे सोपे जाईल 

5) तोंडावर पांघरून घेऊन झोपल्यास ; तर काय होईल...
    (1) झोप येणार नाही  
    (2) जीव गुदमरून जाईल
    (3) थंडी वाजणार नाही 
    (4) भीती वाटणार नाही 

6) गढूळ पाण्यात तुरटी टाकली ; तर काय होईल...
    (1) पाणी तुरट होईल 
    (2) पाण्याचा रंग बदलेल 
    (3) गाळ,जड मातीचे कण तळाशी बसतील 
    (4) तुरटी गढूळ होईल 

7) चहाच्या किटलीच्या कडीवर प्लॅस्टिक पट्टी बसविल्यास ; तर काय होईल...
    (1) किटली आकर्षक दिसेल 
    (2) हात भाजणार नाही 
    (3) चहा थंड होणार नाही.
    (4) कडी दिसणार नाही.

8) पिकापर्यंत पाटाने पाणी नेले तर ; तर काय होईल...
    (1) जमीन अधिक भिजेल 
    (2) पाणी वाया जाईल 
    (3) पिके जोमदार वाढतील 
    (4) जमिनीत पाणी जिरून पिकाला पुरेसे पाणी मिळणार नाही.

9) उघडे अन्न पदार्थ खाल्ले ; तर काय होईल...
    (1) अशक्तपणा वाटू लागेल 
    (2) भूक लागणार नाही 
    (3) रोग होईल 
    (4) शालेय जेवणाचा डबा शिल्लक राहील 


10) एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला  ; तर काय होईल...

    (1) जेवल्यासारखे वाटेल 
    (2) लाळरस अधिक निर्माण होऊन पचन चागले होईल  
    (3) तोंड दुखू लागेल 
    (4) दात लवकर पडतील  


11) धान्य वाळविले नाही ; तर काय होईल...

    (1) धान्य अधिक काळ टिकेल  
    (2) धान्यास कीड लागेल 
    (3) धान्य बेचव लागेल
    (4) धान्याचे वजन वाढेल 


12) पेरणीनंतर अनेक दिवस पाऊस पडला नाही  ; तर काय होईल...

    (1) पिकांवर रोग पडतील 
    (2) रोपे जोमाने वाढतील  
    (3) जमिनीचा कस वाढेल 
    (4) बिया करपून जातील 

13) हृदय बंद पडले  ; तर काय होईल...
    (1) रक्ताभिसरण थांबेल 
    (2) माणूस बेशुद्ध होईल  
    (3) मृत्यू येईल  
    (4) शरीराला अशुध्द रक्तपुरवठा होईल 


14) जमिनीत सतत पीक काढले  ; तर काय होईल...

    (1) धान्यटंचाई कमी होईल 
    (2) आर्थिक गुणवत्ता येईल 
    (3) उत्पादन खर्च वाढेल 
    (4) जमिनीचा कस कमी होईल  


15) घाईघाईने जेवण केले  ; तर काय होईल...

    (1) जेवण लवकर होईल 
    (2) पाणी अधिक पिणे भाग पडेल  
    (3) अन्नपचन लवकर होईल 
    (4) ठसका लागेल  


16) वनस्पतींची बेसुमार तोड केली ; तर काय होईल...

    (1) दुष्काळ पडेल 
    (2) उत्पादन घटेल 
    (3) सावली मिळणार नाही  
    (4) पर्यावरणाचा समतोल ढळेल  


17) धान्य आंबविले  ; तर काय होईल...

    (1) पौष्टिक घटक तयार होतील 
    (2) धान्याची नासाडी होईल  
    (3) धान्य कोणीही खाणार नाही 
    (4) धान्य बेचव होईल 


18) अन्नपदार्थ वाजवीपेक्षा जास्त शिजवलेतर ; तर काय होईल...

    (1) पचनास हलके होतील  
    (2) अन्नपदार्थातील जीवनसत्वे नष्ट होतील  
    (3) अन्न चविष्ट होईल  
    (4) अन्न अधिक खावेसे वाटेल  


19) भाज्या न धुता वापरल्या  ; तर काय होईल...

    (1) अधिक पोषक द्रव्य मिळतील  
    (2) आतड्याचे, पोटाचे रोग होतील 
    (3) भाज्या रुचकर लागतील 
    (4) भाज्यातील जीवनसत्वे कमी होणार नाहीत  


20) काचेला एका बाजूने काळा कागद चिकटविला  ; तर काय होईल...

    (1) काच पारदर्शक होईल  
    (2) काच अपारदर्शक होईल   
    (3) काच अर्धपारदर्शक होईल  
    (4) काळ्या कागदाने अधिक उष्णता शोषली जाऊन काच तडकेल 





❃❃ संकलक 
श्री .औटी बबन मोहन 
जि.प शाळा खांडवी, केंद्र- कोंभळी .
ता.कर्जत,जि.अहमदनगर 
 ☎ ९४२१३३४४२१ 

=======================

उत्तरे :- 

प्रश्न क्रमांक
उत्तर क्रमांक
1
4
2
4
3
3
4
1
5
2
6
3
7
2
8
4
9
3
10
2
11
2
12
4
13
3
14
4
15
4
16
4
17
1
18
2
19
2
20
4